प्रेमाने उत्तुंग भरलेला समुद्र
आणि त्याच्या अलगदच येणार्या लाटांमधे
मदमस्त भिजलेली तु..
वार्याच्या त्या मंद झुळकेने हळुच
तुझ्या चेहर्यावर आलेला केस..
तु मोठ्या अदबीने सावरावा हळुवार..
माझे डोळे एकटक तुझ्याचकडे बघत रहावे
समुद्राच्या लाटांने बहरलेली ती संध्याकाळ
विसरुनही विसरता येत नाही...
गच्च अंधारात हळुच तु
माझा हात पकडावा...
मलाही प्रेमाचा स्पर्श हवाहवासा वाटुन
मी तो हात सैल सोडावा..
दोन चार पावलं चालुन
मधेच ढगांचा गडगडाट व्हावा
आणि तु अलगदच माझ्या कुशीत यावी..
मुसळधार पावसाने बरसलेली ती रात्र
विसरुनही विसरता येत नाही..
तुझ्या जाण्याचा विरह, या काळजात
चिरुन जात होता...
एकही शब्द न बोलता ह्रदयाचा पिंजरा व्हावा
आणि त्यात तुझ्या आठवणी कैद कराव्या..
पण आठवणीच त्या.....
तुझ्या जाण्यामुळे तुझी आठवण काढण सुद्धा
मला पाप वाटावं..
जुल्मी या दुनियेत माझं ह्रदयच बंद पडावं
आणि उरावं ते फक्त तुझं प्रेम...
अंधारलेल्या या जीवनात माझा श्वास बनलेली तु
विसरुनही विसरता येत नाही.....
विसरुनही विसरता येत नाही.....
-नयन मोहितकर
Comments
Post a Comment