विचारांच्या गर्दीत उभं असलेलं माझ मनं
कसं सैरावरा पळत होतं
कुठेतरी विसावा घेऊन
चार क्षण जगुन बघतो
म्हणत होतं....
विसंगतच असतात काही नाती
स्वतःच्या गरजेसाठी आपापल्या परीने
वापरुन घ्यावं...
आणि आयुष्याच्या कुठल्यातरी
उंच कड्यावर नेऊन ढकलुन द्यावं..
एखाद्यासोबत आयुष्याची सारी
क्षितिज स्पर्श करुन
येण्याची स्वप्ने बघावी
आणि ती स्वप्नं झाडांची पानं तुटतात
तशी सहज गळून पडावी..
मग ऊरावा तो फक्त
उत्तुंग आकाशाच्या मायेचा सागर..
तुटलेल्या त्या ह्रदयाला
सहज डूंबवाव त्यात क्षणभर....
विसरावं ते सगळं एका झटक्यातं
सुरवात करावी नवी...
एका पालवी फुटलेल्या आयुष्याची...
विसरलेल्या सगळ्या भावनांची..
मरगळुन पडलेल्या त्या जुन्या नात्यांची..
पण आता खरचं गरज आहे त्याला
कुणाच्या तरी चार क्षणांची. .
कुणाच्या तरी चार क्षणांची. .
-नयन मोहितकर..
Comments
Post a Comment